इंदापूर येथील मौजे लुमेवाडी लिंबोडी येथील ग्रामस्थांना पाणी टंचाई तीव्र प्रमाणात भासत आहे, या पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत गावचे सरपंच व इतर कोणतेही नेते लक्ष देत नाहीत ग्रामस्थ सरपंचाकडे वारंवार तक्रार घेऊन जाऊनही ग्रामस्थांना निराश होऊन माघारी जावे लागत आहे. येथील लोकांना पाण्यासाठी कामावरून घरी राहावे लागत आहे, कामाला नाही गेलो तर खायचं काय हाही प्रश्न भेडसावत आहे, गावातील हातपंप बंद पडल्याने दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावे लागत आहे. नदीलाही पाणी नाही विकतचे पाणी किती दिवस पिऊ असेही तेथील महिला ग्रामस्थांनी व्यथा व्यक्त केली आहे व गावातून हंडा घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, पाणी प्रश्न सुटेपर्यंत मतदानावर ही बहिष्कार टाकणार असल्याचे मौजे लाखेवाडी निंबोडी येथील महिला ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.
इंदापूर तालुक्यातील जलजीवन मिशन हे फक्त नावापुरतेच आहे का?
हर घर जलजीवन मिशन ग्रामीण 15 ऑगस्ट 2019 रोजी लॉन्च करण्यात आले होते तर 2024 पर्यंत फंक्शन हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन द्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे परंतु इंदापूर तालुक्यातील बऱ्याच गावातील जलजीवनचे काम हे अर्धवटच आहे तर काही ठिकाणी कामाला सुरुवात ही नाही, त्यामुळे हर घर जल जीवन मिशन हे फक्त नावापुरतेच आहे का असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील जनता करत आहेत, लोकांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, स्थानिक पुढारी, सरपंच, ग्रामसेवक, तालुका प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी घेऊन जाऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे यामुळे गोरगरीब लोकांचे हाल होत आहे. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण?