मौजे लुमेवाडी लिंबोडी येथे काल दि.२२ रोजी महिला ग्रामस्थांनी पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला होता व मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले होते यासाठी लाईव्ह महान्यूज द्वारे बातमी प्रसारित केली होती
पायपीट करून दररोज दीड ते दोन किलोमीटर वरून रानातून पाणी आणावे लागत होते गावातील सर्व हातपंप आटून गेल्यामुळे पाण्याचे तीव्र समस्या निर्माण झाली होती याची बातमी लाईव्ह महान्यूज द्वारे प्रसारित करण्यात आले होते, याची दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी घेतली व तातडीने पाण्याचा बोरचे स्वखर्चातून काम चालू केले. याचे भूमिपूजन गावातील महिला ग्रामस्थांनी केले, यावेळी ग्रामस्थांनी लाईव्ह महान्यूज आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे आभार मानले. गावांमध्ये पाण्याच्या बोर घेतल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.