इंदापूर :- शहा गावासाठी असलेला मुख्यरस्ता व गावातील ठिकठिकाणी सिमेंट रस्ते यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसातच हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार यातून बघायला मिळत आहे, याचप्रमाणे शहा गावातील गटार लाईन, जलजीवन मिशन, पाण्याचे बोर, पाणी फिल्टर वॉटर सप्लाय हे कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. वारंवार या कामाबद्दल तक्रार अर्ज व माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मिळण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्ज केले जात आहेत परंतु प्रशासकीय अधिकाऱ्या कडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.
या अधिकारी व ठेकेदारांना अभय कोणाचं?
शहागावाप्रमाणेच इंदापूर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी रस्ता जलजीवन मिशन गटार लाईन याप्रमाणे अनेक कामाचा दर्जा हा निकृष्ट पद्धतीचा आहे. हे ठेकेदार कोणालाही घाबरत नाहीत या ठेकेदारांबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही अधिकारी कोणतीही कार्यवाही करून कारवाई करत नाहीत त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामसेवक, ठेकेदार, व अधिकारी यांची एक प्रकारे साखळी आहे का ? व या अधिकाऱ्यांना अभय कोणाचं आहे ? असा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे.
इंदापूर तालुक्यातील ठेकेदार व अधिकाऱ्यांना अभय देणाऱ्यांनाच आ. रोहित पवार यांनी मलिदा गॅंग असे संबोधतात का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.