कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते ते काम..
सतेज पाटील म्हणाले की, भाजपची बिहारमध्ये आणि दक्षिण भारतात काय अवस्था होणार? ही आकडेवारी समोर आहे. मात्र, स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चारशे पारचा नारा द्यावा लागतो. भाजप 214 च्या वर जात नाही ही देशपातळीवरची आकडेवारी आहे. कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते त्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा प्रामाणिकपणे करत आहेत. कोल्हापूरमध्ये मोदी, आदित्यनाथ, अमित शाह प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही.
काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स
पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालं आहे. कोल्हापूरच्या जनतेने ठरवलं आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल, खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरला आहे. आम्ही पण इथलेच आहोत आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जात आहे. पाच वर्षात संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून ते आता टीका करत आहेत. याच अजिंक्यताराचा रोल 2019 साली काय होता? अशी विचारणाही सतेज पाटील यांनी केली. लोकांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम ते काढू शकत नाहीत. चंद्रकांतदादा यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे, पुण्यात हू इज धंगेकर म्हटले होते त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.